स्थापना २००२

|| श्री ||

रजि. महा/११५६/२०१८/ठाणे

ढोल-ताशांचा गजर, भक्तीचा जल्लोष आणि
दिघ्याच्या विघ्नहर्त्याच्या भव्य आगमनास...
00
दिवस
00
तास
:
00
मिनिटे
:
00
सेकंद
बाकी..!

रौप्य महोत्सवी - २५ वे वर्ष!

श्री अष्टविनायक प्रतिष्ठान, बिंदू-माधव नगर, दिघा
"दिघ्याचा विघ्नहर्ता "

आपल्या सर्व गणेशभक्तांचे हार्दिक स्वागत!
हे वर्ष आमच्यासाठी अत्यंत आनंदाचे, अभिमानाचे आणि अविस्मरणीय आहे. कारण "दिघ्याचा विघ्नहर्ता"
आता रौप्य महोत्सवी २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे!
सन २००२ मध्ये सुरू झालेला हा गणेशोत्सव आज २५ व्या वर्षात प्रवेश करत आहे. आपल्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळेच हा प्रवास यशस्वी झाला आहे. गेली २५ वर्षे गणरायाची सेवा आणि सांस्कृतिक परंपरा जपत, "दिघ्याचा विघ्नहर्ता" आज श्रद्धा, भक्ती आणि एकतेचे प्रतीक बनला आहे.
यंदाचा रौप्य महोत्सवी गणेशोत्सव अधिक भव्य, दिव्य आणि संस्मरणीय करण्याचा आमचा संकल्प आहे. या उत्सवात आपण सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हा सोहळा अधिक यशस्वी करावा, हीच श्रींच्या चरणी प्रार्थना.
आपले प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हेच आमची खरी ताकद आहे.

Tutari_vadak_left

मंडळाचा गौरवशाली प्रवास

icon
Tutari_vadak_right

श्रद्धेची पायाभूत कहाणी

दिघा, नवी मुंबई – श्रद्धा, भक्ती, आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेला एक शांत आणि प्रगल्भ परिसर. याच परिसरात सन २००२ मध्ये, अनुभवी व श्रद्धावान ज्येष्ठ मंडळींच्या पुढाकारातून स्थापन झाले "श्री अष्टविनायक मित्र मंडळ" हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.

सन २००२. परिसरातील एका छोट्या जागेत, हाताशी असलेली थोडीशी साधनं, शेजारील घरांमधून आणलेले वस्तू, लाईटिंग्स व इतर सामग्री – आणि त्या पार्श्वभूमीवर बसवलेला दिघ्याचा पहिला विघ्नहर्ता! संपूर्ण मंडप आणि आरास हे त्या काळच्या श्रमदानातून तयार झाले होते. जवळपासच्या मुलांनी मदत केली, महिलांनी पुजेसाठी सजावट केली, आणि रात्री उशिरापर्यंत भजन-आरत्या झाल्या. ते पहिले दिवसच या मंडळाचं संस्कारशील आणि एकात्मिक भविष्य ठरवून गेले.

काही काळानंतर, परिसरात "श्री अष्टविनायक मित्र मंडळ" या नावाने दोन स्वतंत्र मंडळे असल्यामुळे भाविक व नागरिकांना संभ्रम निर्माण होऊ लागला. या अडचणी टाळण्यासाठी व स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी मंडळाने आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानुसार, मंडळाचे नवे नाव झाले – “श्री अष्टविनायक प्रतिष्ठान”.

गणेशोत्सव हे केवळ धार्मिक आयोजन न राहता, सामाजिक एकतेचे आणि संस्कृतीचे प्रतीक व्हावे, या विचाराने मंडळाची सुरुवात झाली. गणपती बाप्पाच्या मूर्तीपासून ते देखावा, आरास, मंडप, आरती, भजन व सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक गोष्टीत एक नवीनतेचा आणि भक्तीभावाचा अनुभव मिळत गेला.

“दिघ्याचा विघ्नहर्ता” – नावामागील प्रेरणा

गेल्या दोन दशकांत, हे मंडळ भक्तांच्या मनात श्रद्धेचे स्थान निर्माण करत गेले. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण – सन २०२३ साली, मंडळाने आपल्या गणेशमूर्तीची ख्याती जनमानसात अधिक दृढ व्हावी आणि भक्तांच्या मुखी सहजतेने रूजावी यासाठी, आपल्या गणेशास “दिघ्याचा विघ्नहर्ता” हे नाव प्रचलीत करण्याचा प्रस्ताव मांडला. या अभिनव संकल्पनेला मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकमुखाने आणि उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवला. मंडळाच्या कार्यकारिणीच्या एकमताने या निर्णयाला अंतिम रूप देण्यात आले.

या ऐतिहासिक निर्णयाचे औचित्य साधून, मंडळाच्या स्थापनेपासून आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते, उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते, वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक आणि प्रसारमाध्यमांच्या साक्षीने, "दिघ्याचा विघ्नहर्ता" हे नाव औपचारिकरीत्या घोषित करण्यात आले. या विशेष क्षणाने मंडळाच्या प्रवासात एक नवा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आणि आज “दिघ्याचा विघ्नहर्ता” हे नाव श्रद्धेचे, भक्तीचे आणि सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून संपूर्ण परिसरात सुप्रसिद्ध झाले आहे.

उत्सवांचे वैभव आणि सामाजिक बांधिलकी

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात येथे भव्य देखावे, पारंपरिक व आधुनिक सजावट, आणि दिवसेंदिवस वाढणारी भाविकांची श्रद्धा पाहायला मिळते.मंडळाची वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती, कलात्मक मंडप व आरास, तसेच दररोज होणारे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे दिघा, नवी मुंबई येथील एक महत्त्वाचा सांस्कृतिक व धार्मिक ठेवा म्हणून या मंडळाची ख्याती आहे.

हे मंडळ केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता, वर्षभर विविध सण-उत्सव उत्साहाने व भक्तिभावाने साजरे करतं, आणि सामाजिक सलोखा व एकोप्याला प्रोत्साहन देतं.

सणांचे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन :

  • होळी व रंगपंचमी: पारंपरिक होलिका दहन आणि रंगांची आनंददायी उधळण.
  • कोजागिरी पौर्णिमा: चंद्रप्रकाशात सांस्कृतिक कार्यक्रम व दुध-फळांचे सामूहिक वाटप.
  • दिवाळी: परिसरात लक्ष वेधून घेणारा भव्य कंदिल – एक खास आकर्षण.
  • महाशिवरात्र: हरिनाम सप्ताह, रात्रभर भजन, अभिषेक, आणि महाप्रसाद यांचं भव्य आयोजन.

या सर्व सणांमध्ये मंडळाचा भक्तिभाव, नियोजनशैली आणि समाजस्नेह प्रकर्षाने जाणवतो, आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हाच मंडळाचा खरा बळ आहे.

हिंदू संस्कृतीचा जागर – नव्या पिढीसाठी :

हिंदू परंपरा, इतिहास, आणि मूल्यं नव्या पिढीपर्यंत पोहोचावीत यासाठी मंडळ मोठ्या पडद्यावर सामूहिक चित्रपट प्रदर्शन आयोजित करतं.यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या थोर व्यक्तींच्या जीवनचरित्रांवर आधारित प्रेरणादायी चित्रपटांचा समावेश असतो.

भक्तीमय वातावरण निर्माण करणारे उपक्रम :

मंडळ भजन, कीर्तन, हरिपाठ, आणि प्रवचन यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून परिसरात सकारात्मकता आणि आध्यात्मिक उन्नती घडवून आणतं.हे उपक्रम केवळ धार्मिक नसून, संस्कार, ऐक्य, आणि मूल्यशिक्षण यासाठी प्रभावी ठरतात.

समाजोपयोगी उपक्रमांचे योगदान

मंडळ विविध सामाजिक उपक्रमांतही पुढाकार घेत असते – आरोग्य शिबिरे, रक्तदान, पर्यावरण जनजागृती, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गरजूंना सहाय्य अशा विविध उपक्रमांद्वारे मंडळ आपले सामाजिक भान जपते.

समारोप

गेल्या दोन दशकांचा हा प्रवास म्हणजे एक भक्तीची वाटचाल, संस्कृतीचे जतन आणि समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रतीक आहे. “दिघ्याचा विघ्नहर्ता” ही केवळ एक मूर्ती नाही, ती दिघ्याच्या लोकांची श्रद्धा, अभिमान आणि एकतेची भावना आहे.

आगामी काळात हे मंडळ अधिक भक्तिभावाने, नवकल्पनांसह आणि समाजसेवेच्या दृष्टीने कार्यरत राहो, हीच विघ्नहर्ता चरणी प्रार्थना!

कार्यकारी मंडळ

सन २०२५-२०२६

"लवकरच उपलब्ध होणार"

गणेशोत्सव

एका समांतर रेषेत मागे वळून पाहिल्यास स्पष्ट जाणवतं की, “श्री अष्टविनायक प्रतिष्ठान – दिघ्याचा विघ्नहर्ता” या मंडळाने सन २००२ मधील साध्या प्रारंभापासून आजवर भव्यतेची, भक्तीची आणि समाजाभिमुखतेची अखंड परंपरा जोपासली आहे. स्थानिकांच्या श्रमदानातून उभारलेला पहिला मंडप आणि साधेपणातही मनाला भिडणारी मूर्ती या पायावर मंडळाचा प्रवास आकार घेत गेला. हा प्रवास केवळ उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता समाजाला दिशा देणारा आणि संस्कृतीचे जतन करणारा ठरला.

दरवर्षी भाविकांच्या मनाचा ठाव घेणारी उत्कृष्ट गणेशमूर्ती व तिची कलात्मक सजावट, आकर्षक थीम्सने साकारलेले मंडप, बाप्पाची अप्रतिम आरास, रस्त्यांवर झगमगणारी रोषणाई, सामाजिक संदेश देणारे बॅनर आणि स्वागतासाठी उभारलेल्या भव्य कमानी—या सर्वांचा संगम उत्सवाला आगळंवेगळं वैभव प्रदान करतो. म्हणूनच दरवर्षीचा गणेशोत्सव हा कलात्मक सौंदर्य, भक्तीमय वातावरण आणि सामाजिक जाणिवांचे जिवंत दर्शन घडवतो. याच कारणामुळे दिघ्यातील प्रत्येक भाविकाच्या मनामनात आज हे समीकरण खोलवर रुजले आहे—

“श्री अष्टविनायक प्रतिष्ठान – दिघ्याचा विघ्नहर्ता” = भक्तिभाव + भव्यता + सामाजिक बांधिलकी

भव्य आगमन :

सांस्कृतिक ब्रास बँडच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि फटाक्यांच्या आतषबाजीच्या प्रकाशात बाप्पाचे स्वागत करण्यात येते. दिघा-तलाव ते विघ्नहर्ता मंडप हा मार्ग भक्तिभावाच्या लहरींनी दुमदुमून जातो. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आणि भक्तिभाव दिसून येतो. "दिघ्याच्या विघ्नहर्ताचा विजय असो!" या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात बाप्पाची भव्य मूर्ती मंडपात विराजमान होते.

श्रींची प्राणप्रतिष्ठा :

मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ब्राह्मण यांच्या उपस्थितीत, मंत्रोच्चारांच्या गजरात पहाटे विघ्नहर्ताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. हा मंगल सोहळा भाविकांच्या हृदयात भक्तीची ऊर्जा संचारतो. त्या पवित्र क्षणी संपूर्ण मंडप परिसर दिव्य तेजाने उजळून निघतो, आणि सर्वांच्या मनात असीम आनंद, शांती व समाधान ओसंडून वाहते.

सुस्वर भजन :

गणेशोत्सवात स्थानिक कलाकार व भजनी मंडळे आपल्या गोड स्वरांनी गणरायाची महती गातात. "विठ्ठलाच्या" भक्तिगीतांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघते. या सोहळ्यात लहानांबरोबरच वयोवृद्धही उत्साहाने सहभागी होतात, आणि भाविकांच्या मनाला शांतीचा लाभ होतो.

समाजोपयोगी उपक्रम :

मंडळ केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता विविध समाजोपयोगी उपक्रमांत सक्रिय सहभागी होते. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, शैक्षणिक मदत आणि पर्यावरण जनजागृती अशा उपक्रमांतून मंडळाने नेहमीच समाजसेवेची खरी ओळख जपली आहे.

बालस्पर्धा व उपक्रम :

उत्सवाच्या काळात लहान मुला-मुलींसाठी चित्रकला, निबंधलेखन, नृत्यस्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमुळे मुलांच्या सुप्त प्रतिभेला वाव मिळतो आणि गणेशोत्सव शिक्षण, संस्कार व आनंद यांचा सुंदर संगम ठरतो.

हळदी-कुंकू व खेळ :

गणेशोत्सवात महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू सोहळा हा अविभाज्य भाग आहे. पारंपरिक परंपरेनुसार मंगलप्रसादाचे वाटप केले जाते आणि विविध मनोरंजक खेळांमुळे महिलांचा उत्साह व सहभाग अधिक रंगतदार होतो. दरवर्षी अनेक महिला उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होतात.

सत्यनारायण पूजा आणि महाप्रसाद :

गणेशोत्सव काळात मंडळातर्फे सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात येते. या प्रसंगी दिघा परिसरातील विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते आणि असंख्य भाविक आपल्या कुटुंबासह सहभागी होतात व प्रसादाचा लाभ घेतात. संध्याकाळी महाप्रसाद वितरणाच्या वेळी मंडप परिसर भक्तांच्या उपस्थितीने गजबजून जातो.

विसर्जन मिरवणुक :

अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणूक मंडपातून सायंकाळी ठीक ७:०० वाजता निघते. सांस्कृतिक ब्रास बँडचा गजर, फुलांची सजावट आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ही मिरवणूक खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरते. शेवटी दिघा तलाव परिसरात “पुढच्या वर्षी लवकर या” या हाकेसह विघ्नहर्त्याला निरोप दिला जातो.

माध्यमांतील दखल

दिघ्याच्या विघ्नहर्ताच्या भक्तीमय प्रवासाची विविध वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल आणि डिजिटल माध्यमांनी घेतलेली विशेष दखल.

एक हात मदतीचा

आपले योगदान अन्नदान किंवा देणगीच्या स्वरूपात द्यायचे असल्यास, वेबसाइटवरील समाजमाध्यमांद्वारे संपर्क साधावा.

संपर्क

icon

श्री अष्टविनायक प्रतिष्ठान, दिघा

शिव-भूषण रोड, बिंदू-माधव नगर, दिघा, नवी-मुंबई : ४००७०८